माझ्या स्वप्नातील भारत मराठी निबंध | India of MY Dreams Essay in Marathi | Majhya swapnatil Bharat Marathi nibandh

jivmarathi.blogspot.com

माझ्या स्वप्नातील भारत मराठी निबंध 
| India of MY Dreams Essay in Marathi


        आपल्या भारत देशात खूप वर्षापासून अनेक जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने व प्रेमाने व शांततेने राहत आहेत. मधुमालती च्या वेलीवर ज्याप्रमाणे अनेक रंगाची फुले एकत्र असतात तसेच त्या प्रमाणे विविध  जाती धर्म या भारत देशामध्ये एकत्र राहत आहेत. 
      सध्या मात्र सर्वत्र अराजकता निर्माण झाल्याचे चित्र  दिसत आहे. माझ्या स्वप्नातील भारतात मात्र अराजकता नसेल. माझ्या स्वप्नातील भारत कसा असेल ते आता आपण "माझ्या स्वप्नातील भारत " या मराठी निबंधात पाहणार आहोत.

India of MY Dreams Essay in Marathi
माझ्या स्वप्नातील भारत|Majhya swapnatil Bharat Marathi nibandh



विविधेतून ऐक्याचा दे,
जगा नवा संदेश |
असा आगळा जगावेगळा ,
माझा भारत देश |

              या छोट्याश्या काव्यपंक्तीतून आपल्याला सहज समजेल की आपला भारत देश किती महान आहे व  विविध रंगांनी आणि विविध परंपरांनी नटलेला आपला भारत देश जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. अत्यंत समृद्ध असा सांस्कृतिक वारसा लाभलेला हा आपला महान  देश अगदी पुरातन काळापासून संपूर्ण जगाला प्रेरणास्त्रोत ठरलेला आहे.

              या देशातील पराक्रमी व  कष्टाळू तरुण चारित्र्यसंपन्न दिसू दे, असा आशीर्वाद मला लाभू दे. परस्परांतील जातिभेद विसरून आमच्यात एकजूट होऊ दे. या जगातून मुळासकट अस्पृश्यता नाहीशी होऊ दे. जे दुर्जन व निंदक आहेत, त्यांच्या मनातही सत्याची चाड वसू दे, असा वर मला मिळावा

             या भारतातील लोकांमध्ये भावंडांप्रमाणे प्रेम व स्नेह सतत राहू दे. हे देवा, असा मला आशीर्वाद दे. सर्व
पंथांमध्ये व संप्रदायांमध्ये एकता दिसू दे, त्यांच्या विचारांत फरक नसू दे. (सर्वजण एका विचाराने कार्यकरू दे.)सर्व हिंदू, ख्रिश्चन, मुस्लीम बांधव मग त्यांतील गरीब आणि श्रीमंत एकजुटीने आनंदात राहोत. यासर्वांमध्ये स्वातंत्र्याचा मनमुक्त आनंद वसू दे, असा वर मला दे. सगळ्यांना माणुसकी व राष्ट्रप्रेम कळू दे. सर्व प्रार्थनास्थळांवर एकत्र प्रार्थना होऊ दे.

          आज आपल्या भारताची अवस्था फार वाईट आहे. संप्रदायीकता आणि जातिवाद असलेल्या भारताच्या अवस्था हि संपूर्ण जगात भारताची बदनामी करत आहे. पण माझ्या स्वप्नातील भारतात मानवता हाच खरा धर्म असेल आणि हिंदू , मुस्लीम , शिख , इसाई यांच्यात रक्ताचे नाते नसेल तरी देखील  हृदयाचे नाते असेल.

        असा आहे माझ्या स्वप्नातील भारत . आज आपण सर्व मिळून एक प्रतिज्ञा करू कि आपण आपला भारत देश स्वच्छ आणि सुंदर बनूया जात आणि धर्म भेद न करता सर्वाना सामन हक्क मिळूद्या.आपण सर्व स्वप्नातील भारत देश खर मध्ये घडवू या. 

धन्यवाद 

अजून निबंध वाचण्यासाठी खाली क्लिक करा 

Post a Comment

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले मौल्यवान मत नक्की मांडा व पुन्हा भेट द्यायला विसरू नका.

थोडे नवीन जरा जुने