jivmarathi.blogspot.com
सकाळचे प्रसन्न वातावरण म्हणजे खूपच छान मनाला आनंद देऊन जाते असेच एक पहाट ती पहाट तो प्रसंग माझ्याही जीवनात घडला. ते प्रसन्न वातावरण माझ्या मनाला मोहून गेले. चला तर मग बघुया छान निबंध रम्य पहाट निबंध
रम्य पहाट निबंध मराठी
| Essay on pahat in Marathi
जो व्यक्ती सकाळी लवकर उठतो त्याची च आरोग्य संपदा मोठ्या प्रमाणात असते असं नेहमीच आपल्याला सांगितलं जातं आणि ते एकदम बरोबर सांगितले जाते . आत्ताच्या आणि पूर्वीच्या काळातीलही अनेक यशस्वी लोकांच्या मुलाखती जर आपण बघितल्या तर त्यांच्या यशामागे असणाऱ्या अनेक सवयींमध्ये पहाटे उठणे ही सवय बहुतांशी लोकांमध्ये असल्याचे दिसून येते.
पहाटेची वेळ अतिशय प्रसन्न असते .रोमारोमात चैतन्य फुलवणारी. मनाला मोहवणारी अल्हाददायक पहाट दिवसभराच्या कामासाठी ऊर्जा आपल्या शरीरात निर्माण करते. विशेषतः पावसाळ्यानंतरच्या काळातील पहाट अधिक चैतन्यमय प्रसन्न असते कारण या पहाटे मध्ये ग्रीष्मातील अंग जाळणारी दाहकता नसते, तसेच वर्षा ऋतु मधील पावसाची संततधारही नसते.
स्वच्छ निळे आकाश असते आणि त्यामध्ये पांढऱ्या रंगांची दाटी हे बघून म्हणाला अगदी आल्हाददायक वाटते . एखाद्या कुशल चित्रकाराने सहजपणाने आपल्या कुंचल्यातून चित्र रेखाटावे तसेच सर्वात महान चित्रकार असलेल्या निसर्गाने रेखाटलेले हे चित्र आणि त्यातील रंगसंगती अप्रतिमच असते. साधेपणातील सौंदर्य आपल्या निदर्शनात येते. अशावेळी माझ्या मनात हिंदीतील एक वाक्य सहज आणि सतत येते ते म्हणजे," सादगी मे ही सुंदरता हैं! "
हिवाळ्यातील सकाळ मात्र फारच गंमत करून जाते. हिवाळ्यात केलेला व्यायाम आरोग्याच्या दृष्टीने अधिक पोषक असतो. त्यामुळे हिवाळ्यात पहाटे फिरायला आणि व्यायाम करायला जाणाऱ्यांची चांगलीच दांडी उडते. सकाळच्या बोचऱ्या थंडीत बिछान्यातून बाहेर येण्याचे धाडसच होत नाही . आईने पांघरून दिलेल्या किंवा आजीच्या जुन्या साडी पासून बनवलेल्या गोधडी मधली ऊब जगावेगळीच असते. त्यावेळी एका क्षणाला मन म्हणते चला आज व्यायामाला जाऊया, पण अंगावरचे पांघरून काढताच थंडीमुळे पुन्हा अंथरुणात शिरून कधी झोप लागते ते कळतच नाही.
मला सकाळी खूप लवकर उठण्याची तशी अजिबात सवय नाही. अर्थात सकाळी लवकर उठणे हे आरोग्यासाठी अतिशय चांगले असते. पण माझ्या आयुष्यात घडलेला हा एक प्रसंग ज्यामुळे मला सकाळी लवकर उठण्याचे महत्व कळले व आता मी नेहमीच लवकर उठण्याचा प्रयत्न करतो.
डिसेंबर महिन्यात ला सुरुवात झाली होती थंडीचा जोर बर्यापैकी वाढलेला होता. थंडीचा अनुभव घेत घेत नाताळ सण कधी आला हे कळलेच नाही नाताळ सणा निमित्त शाळेला तीन दिवस सुट्ट्या होत्या. मामाच्या गावी जाण्याचे ठरवले.
सकाळी साखरझोपेत असताना अचानक मामाने माझ्या अंगावरील पांघरुन काढले . तसे माझ्या गोधडी मध्ये गार गार हवा शिरली आणि मला चांगलीच थंडी वाजून आली. मामा म्हणाला अरे ,"विजय चल शेतात येतो ना? सकाळ झाली."मामाच्या हातातून गोधडी ओढून घेईल पूर्ण अंग झाकुन घेतले मामाला म्हटलं मी येत नाही मला थंडी वाजते.
मामाने मात्र मला नेण्याचा निर्णय केलेला होता .माझ्या अंगावरील गोधडी ओढून घेतली आणि मामाने मला उचलून अंगणात नेले. चुलीवर ठेवलेल्या गरम पाण्याने हात पाय धुतले. घाई घाई मध्ये ब्रश केला आणि मामा मला घेऊन निघाला.
पूर्वेकडे बघितले तर काहीसे तांबडे फुटले होते. आपल्या अनंत प्रकाश मे बाहूंनी संपूर्ण विश्वाला कवेत घेण्यासाठी सूर्यनारायण आसुसला होता. दूर डोंगराच्या आडून जणू तो डोकावून बघत होता. थंडीने गारठलेल्या संपूर्ण जगाला तो आपल्या उदार हातांनी कवेत घेण्याचे जणू मनात आडाखे आखत होता.
नक्की वाचा
टिप्पणी पोस्ट करा
ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले मौल्यवान मत नक्की मांडा व पुन्हा भेट द्यायला विसरू नका.